नमस्कार मित्रांनो,
आज एका महत्वाच्या विषयावर आपल्याला सुसंवाद करायचा आहे. त्याआधी कालचा एक किस्सा सांगायला मला आवडेल. संध्याकाळी माझ्या लहान मुलीसाठी खाऊ घेण्यासाठी दुकानात एका शॉप मध्ये गेलो होतो. शॉप चांगल्या पद्धतीने सजविलेले होते. सर्व वस्तू नीट पाहून झाल्यावर मुलीला आवडणा-या तीन-चार लहान लहान खाऊच्या पुड्या घेतल्या, प्रत्येक पुडीवरची किंमत पाहून धसका बसत होता. त्या चार वस्तूंची किंमत २२५/- रुपये सांगण्यात आली. पैसे देवून शॉप मधून बाहेर आलो. डोक्यात विचार आला कि आमचे वडील आम्हा तीन भावांना खावू आणायचे, तेसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचा आणि स्वाभिमानाने सांगायचे. खावू पोटभर खा ! आजचा दिवस जेवला नाहीत तरीचालेल. संपूर्ण २०/- रुपये खर्च करून खावू आणला आहे. त्यावेळी मनात विचार आला कि २० वर्षापूर्वी पोटभर खावू तीन भावांना आणि तेही २०/- रुपयांमध्ये आणि आज एकटीसाठी हातातल्या लहानशा पिशवीत खावू घेतला तेही २२५/- रुपयाचा.
मित्रांनो सांगायचे तात्पर्य एवढेच कि सतत वाढणा-या महागाईमुळे आपण आपल्या गरजा भागविण्यासाठी अपुरे पडत आहोत. मेहनत जास्त, मिळणारा मोबदलाही जास्त तरीही तडजोड करावी लागते. वर्तमानाची चिंता असताना भविष्यात काय होईल याचा विचार करून घाम सुटतो.
ह्यावर एकच उपाय आणि तो म्हणजे योग्य प्रकारे भविष्यासाठी केलेली गुंतवणूक.
मित्रांनो गुंतवणूक हा शब्द आपण निश्चितच ऐकला असेल. सेमिनार-लेख यातून ऐकला, वाचला असेल, तरीही फरक मात्र जसा व्हायला पाहिजे तसा होत नाही. ह्याला कारण स्वयं शिस्तीचा अभाव आणि आर्थिक शिक्षणाची पुरेपूर माहिती नसणे. म्हणूनच मित्रांनो गुंतवणूक विषय जितका जटील तितकाच महत्वाचा.
होय…
- महागाईवर मात करण्यासाठी
- भविष्यासाठी
- माझ्या आर्थिक स्वप्नांच्या पूर्ततेसाठी
होय…
- भविष्यातील येणा-या आर्थिक संकटांना सामोरे जाण्यासाठी, आणि त्या दिशेने योग्य वाटचालीसाठी
- तुमच्या नंतर तुमचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या सुखी होण्यासाठी
- मुलांचे शिक्षण आणि Retirement Planning करण्यासाठी
- Tax Out Flow कमी करण्यासाठी
मोठ्या संख्येने सामील व्हा ! आणि आर्थिक बदलाचा सकारात्मक आनंद मिळवा.
धन्यवाद
- सुनिल कानाळ (आपला आर्थिक शुभचिंतक)