नमस्कार मित्रांनो...
शिवाजी ....... ज्या फक्त नावाने मुघल सम्राज्याचा थरकाप उडत असे. ज्यांच्या फक्त विचाराने दिल्लीच्या हृदयात धडधड होत असे. आज दुर्देवाने ते नाव तरुणपिढी मधुन विरळ होत चालले आहे.
छत्रपती शिवाजी, एका सरदाराच्या मुलाने एक स्वप्न उराशी बाळगुण.... काही तत्वेची शस्त्रे बनवुन, शुन्यातुन हिन्दवी स्वराज्याची स्थापना केली. सुमारे ३०० वर्षाहुनही अधिक आपले अस्तित्व गमाऊन बसलेल्या मराठीला, क्रुर मुघलांच्या पायदळी तुडवल्या जात असलेल्या मराठी अस्मीतेला आणि गुलामगीरीला आधीन झाल्या मराठी माणसाला स्वातंत्र्याची पहाट, दाखऊन दिली.
आठवा तो इतिहास, स्वराज्यावर चाल करून आलेला तो अफझलखान, हत्तीच बळ..... प्रचंड फौज, पण हे सर्व महाराज्यांच्या बुदधीच्या आणि वाघनखांपुढ़े निकामी पडलं. "शिवाजी हा मुलूख है कितना, सिर्फ मेरे हातकी तीन उंगलीयो जीतना ?" असे म्हणत असलेल्या मग्रुर शाहिस्तेखानाची तीच तीन बोटं त्याच्याच महालात शिरून ज्यांनी छाटुन टाकली. सिद्धिजोहरने पन्हाळ गडाला २१ ह्जारहून जास्त सैन्यानीशी दिलेला अजगरासारख्या वेढयातुन जे चातुर्याने निसटले, दिल्लीमध्ये अपमान सहन न झाल्यामुळे ज्याने खुद्द औरंगजेबाच्याच दरबारात त्याची खैरात उधळून टाकली आणि आपल्या चातुर्याच्या बळावर औरंगजेबाच्या हातावर तुरी ठेऊन त्याच्या कैदेतुन निसटले. ज्यांचा बुद्धीच्या आणि नीतीमत्तेच्या बळावर अन्यायी सम्राज्याविरुद्ध बंड करून सुजलाम सुफलाम राज्यव्यवस्था निर्माण केली. ते शिवाजी महाराज आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांचा नुसता इतिहासजरी कानावर पडला तर मरत्याच्याही मनात आणखी काही काळ मृत्युशी झुंजन्याचं बळ निर्माण होईल. असे आपले छत्रपती शिवाजी महाराज....
परंतु आज, आपल्या याच महाराष्ट्राच्या निर्मात्याला महाराष्ट्रात मानाचे स्थान असु नये ? अरे, परप्रांतीय तर सोडा, परंतु आज पाश्चात्य संस्कृतीत Orkut आणि Net मध्ये, Multiplex मध्ये, Pizza आणि Burger मध्ये रमलेली तरुण मराठी पीढ़ीसुद्धा महाराज्यांच्या या कर्तृत्वापासून वंचित आहेत. त्याला जबाबदार म्हणजे आपली शिक्षण पद्धती. नवीन अभ्यासक्रमात आणि मुख्यत्व: इंग्रजी माध्यमातून शिवाजी महाराजांचा इतिहास वगळला जात आहे आणि दुसरे जबाबदार म्हणजे आपण. आपल्या पिढीचे कर्तव्य आहे की आपण तो इतिहास तरुण पीढीपर्यंत पोहचवायला हवा आणि त्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने महाराजांचा अभ्यास हा करायलाच हवा.
शिवाजी हा एक काळ नव्हता तर ती त्रिकाल बाधित प्रेरणा आहे. आणि तो जीवंत ठेवणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जर आपण खरा इतिहास तरुण पीढीपर्यंत पोहोंचवला नाही तर त्या मुर्ख जेम्स लेनच्या चुकीच्या लिखाणावर त्यांचा विश्वास बसेल आणि त्याला जबाबदार आपणच असु.
"दिपले कित्येकांचे डोळे
असे प्रभावी तेज शिवाजी.....
जे भिडले, लढले
उलघडले ज्यांनी गुलामगीरीचे पाट
असे तरबेज शिवाजी.....
कटले ते हात, उठले जे स्वराज्याकड़े
जे जुडले, त्यांना घडवतो शिवाजी.....
ज्या मातीत मिसळले रक्त मराठयांचे, त्यातूनच घडतील
कित्येक वीर पुन्हा .... त्यांना घडवणारी प्रेरणा शिवाजी..... "
- विनोद अनंत मेस्त्री.