"आय लीड माय लाइफ़" - पर्व दुसरे


"जिंदगी हसने गाने  के लिये है पल दोपल" आपले शिक्षणाचे - कॉलेजचे दिवस असेच असतात. एक स्वप्नांची सुंदर दुनिया, कुठली प्रचंड मोठी जबाबदारी नाही. कुठलं मोठ टेन्शन नाहि. कॉलेज कट्टा, मित्र-मैत्रिणी, कॉलेजच्या कॅन्टीनमधला समोसा,  वडापाव, मिसळपाव, तासन तास गप्पा, सगळ काही स्वप्नवत. कधीही न संपावस वाटणारं स्वप्न. "बस ! सब ऐसाही चलता रहे." 
पण कधीतरी हे स्वप्न संपणार असत. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल कि आई-वडील आपल्याकडे अपेक्षेने पाहू लागतात. एक बैल थकला कि दुसरा बैल  घाण्याला जुंपावा तसं आपल्याला जबाबदारीच्या घाण्याला जुंपून घ्याव लागतं. मग समोर असत ते कठोर वास्तव.  
सकाळी ठरलेल्या वेळेवर बस किंवा ट्रेन पकडा. वेळेवर कामाला पोहचा. दिवसभर ठरलेल्या तारखेला मिळणा-या पगाराच्या अपेक्षेने प्रचंड मेहनत घ्या. संध्याकाळी बॉसने ठरवलेल्या वेळेनुसार ऑफिसमधून निघा. पुन्हा लोकल पकडा, घरी या,जेवून घ्या, टि.व्हि. बघा आणि झोपा. दुस-या दिवशी पुन्हा तशाच दिसणा-या दिवसाला सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हा.  
"जाने कहां गए ओ दिन" असं सातत्याने वाटयाला लागतं. हळूहळू समस्या अतिशय वेगाने वाढायला लागल्यात अस वाटू लागतं. दिवस भराच्या धावपळीत गडबडीत स्वप्न:कडे पाहन राहून जातं. अत्यंत भयंकर अशा चक्रात आपण अडकून जातो. जगण्याची गोडी हळूहळू कमी होवू लागते आणि जीवन जगणे हि फक्त आणि फक्त एक 'फॉंरमँलिटी' बनते. पण मित्रानो हे ते आयुष्य नाहीये ज्यासाठी आपण जन्म घेतलाय.  लागतं आयुष्य यापेक्षा वेगळ असायला हव. मी कसं जगावं हे परिस्थितीने, माझ्या कुटुंबाने, या दुनियेने ठरवू नये. माझ्या आयुष्याची स्टोरी इतरांनी का लिहावी ?  ती मी स्वत: लिहियला हवी . माझे जीवन, माझ्या भावना, माझी प्रगती, माझी स्वप्न, माझी नाती, माझा अर्थ (पैसा) या सर्वांवर माझं नियंत्रण असायला हवं. माझ आयुष्य माझ्या नियात्रणात असायला हवं
"आयुष्य जगण्याचे दोन मार्ग असतात, एकतर स्वत:च्या स्वप्नांसाठी जागा, नाहीतर दुस-यांची स्वप्नासाठी."
मला माझ्या स्वप्नांसाठी जगायचय, मला जे हवय ते मला चांगल्या मार्गाने मिलवायचय. माझ्या आयुष्याचा हेतू फक्त स्वत:पुरता मर्यादित आयुष्य जगण्याचा नाही तर मला या समाजाला आणि देशाला काही योगदान करायचय. मला एक प्रभावी व्यक्तिमत्व, एक उदाहरण बनायचय. पण हे सगळ कस शक्य होवू शकत ?
याचसाठी आम्ही "I Lead My Life" हा उपक्रम तयार केला आहे आणि याचा पहिला पर्व ७ जुलै, २०१३ तारखेला यशस्वीरित्या पूर्ण झाला. या उपक्रमात एकूण चार सत्रांचा समावेश आहे. 

सत्र क्र. १ : Self Mastery (स्वत:वर विजय) 

या सत्रात आपल्या समजुती, ज्या जीवनावर प्रचंड परिणाम करत असतात, त्या समजुतींवर काम केले जाते. स्वत:ला विकसित करण्यासाठी हि सर्वात पहिली आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि याची तुम्हा आम्हा सर्वांनाच गरज आहे. शिवाय या सत्रात आपल्या भावनांवर विजय कसा मिळवावा हे देखील शिकता येणार आहे. 

सत्र क्र. २ : Body Language & Communication Skill. (देहबोली आणि संभाषण कौशल्य)

उत्कृष्ट संभाषण हि काळाची गरज आहे. मी प्रचंड हुशार आहे, बुद्धिमान आहे. पण हि बुद्धिमत्ता आपल्या संभाषणातून दिसली नाहि, आपल्या देहबोलीतून दिसली नाही तर व्यर्थ आहे. 
मला Interview ला समोर जायला भीती वाटते 
मला चार चौघात बोलायला भीती वाटते 
मला नवीन व्यक्तींसोबत ओळख करायला, त्यांच्याशी बोलायला भीती वाटते 
आपल्यापेक्षा प्रभावी व्यक्तिमत्वाशी संभाषण कसं साधाव ते मला कळत नाही 
मला सभांमध्ये, स्टेजवर बोलण्याची भीती वाटते 
या जर आपल्या समस्या असतील तर त्यावर उपाय हे सत्र आहे. 

सत्र क्र. ३ : Finance Mastery (आर्थिक विजय)

महागाई प्रचंड वेगाने वाढत आहे. त्या वेगाने मिळकत वाढत नाहि. महागाई सोबत स्पर्धा करण माझ्या मिळकतीला कठीण जातंय. गुंतवणुकीचे योग्य मार्ग मला माहित नाहीत. सध्याच्या आर्थिक तडजोडीना मी कंटाळलो आहे. पैशाच्या अभावी मला हव तस आयुष्य जगता येत नहिये. मी पैशाच्या मागे धावून थकलो आहे. पैसा माझ्यासाठी काम कसा करू शकतो हे मला माहित नाहि. जर आपल्या या समस्या असतील तर त्याचं उत्तर हे सत्र आहे

सत्र क्र. ४ : Good To Great (चांगलेपनाकडुन महानातेकडे)

देवाने आपल्याला स्वार्थी किंवा स्वत:पुरते तडजोडीचे आयुष्य जगण्यासाठी पाठवलेले नाहि. त्याने आपल्याला एका खास हेतूने या पृथ्वीतलावर पाठवले आहे. या जगातील ९०% हून अधिक लोकांना हा हेतू कधी सापडत नाही किंबहुना ते शोधण्याच्या भानगडीत पडत नाहि आणि मरेपर्यंत एक सामान्य निरर्थक आयुष्य जगतात. हा सत्र आपल्याला जीवनाचा हेतू शोधण्यास मदत करेल. 
आपल्या आयुष्याचा नेमका हेतू काय ?
आपला जन्म नेमका कशासाठी ?  आणि तो कसा शोधावा ?  
हेतू प्राप्त करण्याचे मार्ग काय ?  
Strategic Planning म्हणजे काय ?
या स्पर्धात्मक युगात एक करिअर पुरेसा नाही मग एकाहून अधिक मिळकतीचे मार्ग कसे शोधावेत आणि राबवावेत ?
जगण्याचा मनमुराद आनंद कसा लुटावा ?
या जगाला योगदान कसे करावे ?
येणा-या पिढीसाठी उदाहरण कसे बनावे ? 
अपयशाला यशामध्ये रुपांतरीत कसे करावे ?
याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या सत्रात मिळतील. 
तुमच्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी "I Lead" ची संपूर्ण टीम सज्ज झाली आहे. गरज आहे ती तुमच्या निर्णयाची. एक निर्णय जो तुमच आयुष्य बदलेल. "I Lead My Life" च्या लीडर समूहात प्रवेश करण्यासाठी आजत संपर्क साधा…

आपला पर्व क्र. २ हा रविवार, दिनांक ४ ओगस्ट, २०१३ तारखेला सुरु होणार आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क साधा… 
022-65515004 / 8655850056 / 9819453533

I Lead My Life - पहिला पर्व पूर्ण झाल्या निमित्ताने

I Lead My Life - पहिला पर्वाचा पुरस्कार सोहळा गेल्या रविवारी (७ जुलै, २०१३) पार पडला. माझ्या आयुष्यातील अत्यंत अविस्मरणीय क्षणांपैकी हा एक होता.  
त्याची ३ कारणे आहेत. 
एक - या सोहळ्यात माझ एक स्वप्न सुरु झालं होत ते म्हणजे मध्यमवर्गीय विभागातील मुलांसाठी "व्यक्तिमत्व विकासाचे" धडे देणारा एखादा उपक्रम माफक दरामध्ये चालू करणे आणि हा उपक्रम चालू झाला होता… 
दोन - या उपक्रमा अंतर्गत पहिल्या पर्वामधून १७ जनांनी या उपक्रमाची ताकद अनुभवली आणि त्यांच्या नवीन जीवनाची वाटचाल सुरु सुरु झाली. 
तीन - या उपक्रमाच्या पूर्तता सोहळ्यात माझे तीन आदर्श एकत्र हजर होते. मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेतील सौ. पळशीकर बाई, राष्ट्रपती पदक विजेते पोलिस निरीक्षक श्री. संजय गोविलकर आणि सुप्रसिद्ध गुंवणूक तज्ञ श्री. अरुण सिंघ. 

या उपक्रमा अंतर्गत अत्यंत महत्वाच्या अशा चार गोष्टींवर आपण काम करतो. एक म्हणजे "आपल्या समजुती (Belief Syster – Self Mastery)", दुसरी "संभाषण कौशल्य आणि देह बोली (Communication Mastery)" तिसरी "आर्थिक नियोजन (Financial Mastery)" आणि चौथी म्हणजे "चांगलेपणाकडून महानातेकडे (Good To Great)”.

या संपूर्ण उपक्रमात ४२ दिवसांचा कालावधी प्रचंड अनुभव देऊन गेला. मुलांमध्ये होत असलेले बदल पाहून विश्वास प्रबळ होत गेला. समजुती ख-या किंवा खोट्या नसतात. त्या एकतर उपयुक्त असतात किंवा मर्यादा आणणा-या असतत. समजुतींवर काम करतानाचा एक अनुभव तुम्हाला सांगावासा वाततो. पहिला Session  - Self Mastery झाल्यानंतर माझा मुलांसोबत One To One Session होत असतात. त्यामध्ये मी मुलांची एखादी मर्यादा आणणारी समजूत बदलणार असतो.

प्रियांका नावाची माझी विद्यार्थिनी जी या उपक्रमच्या सुरुवाती आधी अत्यंत खचलेली होती आणि उपक्रम संपताना ती "Star Leader Award" जिंकून गेलि. या प्रियांका सोबत One To One Session चालू असताना तिने तिची मर्यादा आणणारी एक समजुत बदलण्यासाठी निवडली, ती म्हणजे "मला स्वत:च मत नाहि !'
मी तिला विचारले "अस तुला का वाटत ?"
"कारण मला काहीही करायचं असेल तर दुस-याला विचारव लागत, छोट्यात छोटी गोष्ट असली तरी सुद्धा ! मी कपडे जरी विकत घ्यायला गेले तरी सोबत कुणाला तरी न्याव लागत. मला काहीही करायच असेल तर मला माझ्या आईला, मोठ्या भावाला विचारल्या शिवाय ते करायला भीती वाटते, इत्यादी इत्यादी…. 

"या सर्व गोष्टींमुळे तुला वाटत कि तुला स्वत:च मत नाही"
"हो, अगदी !"
"अच्छा मला सांग, तुझी सर्वात जवळची मैत्रीण कोणती ?"
"of course प्रज्ञा"
"का ?"
"कारण, माझ्या प्रत्येक अडत्या वेळी तिने मला साथ दिलेय,  सावरलाय."
"म्हणजे या प्रज्ञा सोबत मैत्री करणं हा तुझ्या आयुष्यातला सर्वात Best Decision होता… Right ?"
"हो… शंकाच नाही"
मग हा Decision घेताना तू कोणाच मत घेतलं होतस ?"
"कोणाच नाही"
"मग, याचा अर्थ तुला तुझ मत आहे… Right  ?"
"हो"

या वेळी प्रियांकाचा चेहरा बघण्यासारखा होत. तिला तिच्या प्रश्नाचे उत्तर मिळालं होत. तिच्या नव्या रूपाशी तिची ओळख झाली होती. अशा प्रकारे प्रियांकाची समजूत "मला स्वत:च मत नाही" एका क्षणात बदलली. 

अशाच कित्येक मर्यादा आणणा-या समजुती आपण बाळगून आहोत. ज्या एका क्षणात बदलू शकतात आणि ते बदलण्यासाठी मदत करण्यास आम्ही सज्ज झालो आहोत. गरज आहे ती तुमच्या प्रोत्साहनाची आणि पाठबळाची. 

देश बदलण्याच प्रचंड सामर्थ्य या मध्यम वर्गीय पिढीमध्ये दडलेलं आहे. त्या सामर्थ्याची आम्ही या पिढीला ओळख पटवून देत आहोत. जग बदलायचं असेल तर प्रथम स्वत:ला बदलाव लागतं आणि हा बदल तुमच्यात घडवण्याच काम I Lead My Life करत आहे. 

असेच I Lead चे किस्से घेवून भेटत राहू… धन्यवाद !!!

- विनोद अनंत मेस्त्री 





उद्योजकाची पहिली भेट - नवी ओळख नवी नाती

४ जुलै २०१२ , मराठी बिझनेस क्लब मध्ये वी आय पी गेस्ट म्हणून बोलण्यात आले होत . mbc सदस्यांचा उत्साह , मिटिंग राबवण्याची पद्धत आणि एकमेकांबद्दल सहकार्याची भावना पाहून थक्क झालो .मराठी उद्योजकांसाठी व्यवसाय बुद्धीची अत्यंत उत्तम योजना म्हणजे MBC मिटिंग. नेट्वर्किंग च्या संकल्पनेवर आधारलेल्या मराठी बिझनेस क्लब म्हणजे उद्योजकांसाठी सुवर्ण संधी म्हणता येईल . नेट्वर्किंग म्हटलं तर नवनवीन लोकांना भेटणं आलं, ओळख करणं, ओळख वाढवणं आणि टिकवणं आलं. परंतु प्रथमच एखाद्या व्यक्तीला भेटल्यावर तिच्याशी ओळक कशी करावी ? बोलण्याची सुरवात कशी करावी ? संभाषण कसं वाढवावं ? आणि त्या एकाच भेटीत त्या व्यक्तीला आपलसं कसं करावं हे प्रश्न कित्येकांना पडत असतात. या सर्व प्रश्नांची उत्तर म्हणून मी हि पोस्ट लिहित आहे. याचा आपणाला निश्चितच फायदा होईल याची मला खात्री आहे.

त्यासाठी काही टिप्स खालील प्रमाणे :-

समोरच्या आवडीच्या विषयाने सुरवात :- मानवाबद्दल एक नैसर्गिक गोष्ट आपण सर्वांनी लक्ष्यात घ्यायला हवी, ती म्हणजे, आपल्यातील प्रत्येकाला एका गोष्टीत प्रचंड रस असतो आणि ती गोष्ट म्हणजे आपण स्वतः. "प्रत्येक व्यक्तीचा प्रचंड आवडीचा विषय म्हणजे, ती स्वतः" असते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला भेटल्यावर तिच्या विषयी प्रश्न विचारा.
उदारण :- "आपण काय करता ?" किवा "आपण कोणत्या क्षेत्रात आहात ?" "आपला गावं ?" "तसे आपण राहायला कुठे आहात ?" किवा त्या व्यक्तीकडे असलेल्या एखाद्या वस्तूचा आधार घेऊन आपण सुरवात करू शकता "nice watch, how is it.. नाही म्हणजे मलासुद्धा असेच घड्याळ घ्यायचय परंतु गोंधळात आहे कोणत्या कंपनीचं घ्यायचं. तुम्हाला या कंपनीचा अनुभव कसा आहे ?" एखाद्या व्यक्तीला तिच्या स्वतःबद्दल विचारणे हा सर्वात उत्तम communication starter मानला जातो.


OPEN ENDED प्रश्न विचारा :- संवाद वाढवण्यासाठी नेमही OPEN ENDED प्रश्नांचा वापर करावा. म्हणजे असे प्रश्न ज्याचे उत्तर विस्तृत मिळेल.
उदारण :- "मला या गोष्टी बदल तुमच्या कडून काही माहिती मिळेल?" "तुम्ही हेच क्षेत्र का निवडले ?" शक्यतो ' yes /no '  प्रकारचे प्रश्न टाळावेत म्हणजे असे  प्रश्न ज्याचे  उत्तर फक्त 'हो' किंवा 'नाही' मध्ये येईल अशा प्रश्नांचा वापर करू नये. ' yes /no'  प्रकारची प्रश्नांची संभाषणे तिथेच थांबवा.  OPEN ENDED  प्रश्नामुळे संभाषण बहरत जात.


मत विचारा :-" या अमुक गोष्टीबद्दल आपलं काय मत आहे ?" हा संभाषण उत्तेजित करणारा उत्तम प्रश्न आहे. कारण प्रत्येकाला आपला मत मांडायला आवडत. परंतु हा प्रश्न विचारताना एक गोष्ट लक्ष्यात घ्यावी ती म्हणजे आपण त्यांना ज्या गोष्टी बद्दल मत विचारतोय, तो त्या व्यक्तीचा आवडीचा माहितीचा विषय असायला हवा !  


परिणामकारक ऐकण:-प्रत्येकाला ऐकणारा हवा असतो हा नियम लक्ष्यात घेऊन, जेव्हा समोरची व्यक्ती बोलत असेल तेव्हा त्याच बोलण काळजीपूर्वक ऐका, समजून घेण्यासाठी ऐका. ऐकून घेतल्याने आपण समोरच्या व्यक्तीला आपलेसे वाटायला लागतो. त्यामुळे आपला संपूर्ण लक्ष त्याचं/तिचं बोलण ऐकण्याकडे केंद्रित करा. ( परिणाम कारक ऐकण, याबद्दल विस्तृत लिहून माझा ब्लोग vinodmestry.blogspot.com वर लवकरच पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन.)


संभाषणाचा शेवट, नात्याची सुरवात :-संभाषणाचा शेवट देखील योग्य रितेने करता यायला हवा. संभाषणाचा शेवट हि नात्याची सुरवात ठरायला हवी.
उदारण :-"sir / madam, धन्यवाद आपल्याकडून ब-याच नव्या गोष्टी समजल्या. तुमच्यासोबत बोलून आनंद वाटला. I hope पुढेही असेच सहकार्य कराल."एक गोष्ट ध्यानात असू द्या, वरील सर्व गोष्टी नैसर्गिकरित्या व्हायला हव्यात, त्यात नाटकीपणा नसावा.



पुढे आपल्याशी संवाद माझ्या ब्लोग मधून साधणार आहेच. तो पर्येंत all the best and as i always believe, you all are the best 

धन्यवाद
Reff. Book : रिचार्ज - आयुष्याची पुनर्बांधणी (लेखक : संजय गोविलकर)

- विनोद अनंत मेस्त्री (9819453533)

असामान्य यशप्राप्तीच्या आठ समजुती...

नमस्कार मित्रांनो,
आपण आपलं आयुष्य समजुतींवर जगत असतो. माणूस हा समजुतींचाच बनलेला असतो (Man is what he believes). आपल्या समजुती अप्रत्यक्ष पणे आपल्या विचारांवर, कृतींवर तसेच शरीरावर परिणाम करत असतात. माझा प्रबळ विश्वास आहे कि आपण जे मानतो ते आज न उद्या घडणारच आहे आणि ते घडते. अनेक वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार हे सिद्ध झालेले आहे कि समजुती आपल्या जीवनावर प्रचंड परिणाम करतात. 
आता पुढील घटना वाचा आणि विचार करा...
एका Freezer मालवाहू ट्रेन मध्ये काम करणारा एक कर्मचारी ट्रेन सुटायला २ तास आहेत हे लक्षात घेऊन फ्रीझर डब्यात झोपला. एका तासाभरात जाग येईल असा त्याचा अंदाज होता. परंतु त्याला जेव्हा जाग आली तेव्हा ट्रेन चालू झाली होती. अशा ट्रेन मध्ये फक्त पहिल्या आणि शेवटच्या डब्यात कर्मचारी आणि मध्ये सगळे फ्रीजरचे डबे असतात. पुढील स्टेशन २ तासावर. फ्रीझर चालू रहाणार आणि तापमान गोठण बिंदूच्या खाली जाणार आणि आपण गोठून मारणार या भीतीने त्याचा थरकाप उडाला. दोन तासानंतर ट्रेन पुढील स्टेशनवर पोहचली आणि हा कर्मचारी मृत अवस्थेत सापडला. post mortem report नुसार त्याचा मृत्यू गोठून झाला होता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या डब्यातला फ्रीजर बंध होता. 
हे सगळ्यात उत्तम उदाहरण आहे कि नुसतं गोठून मारणार या मानण्याने त्या कर्मचाऱ्याचा गोठून मृत्यू झाला. 
समजुती खऱ्या किंवा खोट्या नसतात. त्या एकतर तुम्हाला पुढे घेऊन जाणाऱ्या (useful Beliefs) असतात किंवा तुमच्यावर मर्यादा आणणाऱ्या (Limiting Beliefs) असतात. यशस्वी व्हायचं असेल तर मर्यादा आणणाऱ्या समजुती बदलणं आणि पुढे नेणाऱ्या समजुती स्वीकारणं गरजेचं असतं. 
या जगातील कित्येक यशस्वी लोकांचा अभ्यास केल्यास त्यांच्या अनेक प्रभावी समजुती हाती लागतात. त्यातील अत्यंत महत्वाच्या अशा  आठ समजुती तुमच्यासमोर या सेमिनार मार्फत सादर केल्या जाणार आहेत. ज्या आपण समजून घेतल्या आणि मानल्या तर यश निश्चितच ! 

या सेमिनार मधून आपण काय शिकाल?
१. समजुती आणि Positive Thinking या मधील फरक. 
२. समजुतींचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम.  
३. आपण जे जीवन जगतोय ते केवळ आपल्या समजुतींमुळे. 
४. समजुती बदलून आपलं जग कसं बदलू शकतं. 
५. यशस्वी होण्यासाठी कोणत्या आठ समजुती आपण बाळगायला हव्यात? 

हा सेमिनार कोणासाठी?
जीवनात यशस्वी होण्याची आणि आहे ती परिस्थिती बदलण्याची इच्छा असलेल्या त्या प्रत्येकासाठी.

चला तर मग तयार होवुया आपलं जग बदलायला…  



वक्ते : विनोद अनंत मेस्त्री 
M.Com, C.S. Inter, NLP Practitioner,


रविवार, दिनांक 7 जुलै 2013,
वेळ : सकाळी 10.30 वाजता 
पत्ता : गोवंडी गावदेवी ट्रस्ट हॉल, कुर्ला नागरिक बँक समोर, गोवंडी, मुंबई - 400 088
प्रवेश शुल्क : विनामुल्य          

अधिक माहितीसाठी संपर्क साधा : 
022-65515004 / 8655850056 / 9819453533

प्रवेश पत्रिका आवश्यक



Related Posts Plugin for WordPress, Blogger...