15 ऑगस्ट च्या निमीत्ताने आतापर्यन्त देशासाठी प्राण त्यागणार् या सैनिकांसाठी माझी ही कविता
उरलो बनून ज्वलंत प्रेरणा मना-मनात सर्वांच्या
जरी जगी या उरलो नाही
लाख गोळ्या झेलूनही शत्रच्या या निढळया छाती वरती
किंचीतही मागे सरलो नाही
शत्रुचे इरादे पक्के होते
पण त्याहुनही आमचे ते तोडण्याचे
ते निघाले होते देश तोडाया आमचा
पण आमचा प्रयत्न तो जोडण्याचा
त्यांना वाटले सोपे सारे
कारण जाती-भेद इथे अनेक आहेत
कळे न् त्यांना प्रश्न देशाचा येता
सारे भारतीय एक आहेत
नाही दिसली पत्नी माझी
वाटेला डोळे लावून बसलेली
नाही ऐकली हाक मुलांची हवी हवीशी असलेली
हरलो असेन संसाराशी पण कर्तव्याशी हरलो नाही
उरलो बनून ज्वलंत प्रेरणा मना-मनात सर्वांच्या
जरी जगी या उरलो नाही
लाख गोळ्या झेलूनही शत्रच्या या निढळया छाती वरती
किंचीतही मागे सरलो नाही
No comments:
Post a Comment