"God sit as a silver purifier and refiner."



Hi Friends,
I would like to share one wonderful story regarding a bible verse.That verse is "God sit as a silver purifier and refiner."
Once one lady read this verse but couldn't find the exact meaning, she went to the Church and asked the father. Father adviced her to go to any silversmith and see what is the process of purifying silver. So she took an appointment of a local silversmith expressing her wish to see the process of purifying the silver.
At silversmith's workshop, he told her that to purify the silver I have to hold it in the middle of the fire where flames are the hottest. It removes all impurities in the silver.
She thought for a moment that god holds us in the middle of the fire i.e. in the middle of the difficulties in order to purify us, to make us a better human being.
Silversmith further said that he had to sit their through the entire process and observe carefully because if he hold the silver for little longer, it would be destroyed.
Lady realised that god is always their with us through all our difficulties. Watching us carefully.
"How do you come to know that this is just a right time to take the silver out."
Silversmith replied, "It is so easy. It is when I see my image in it."
So friends, when we experience difficulties or bad patches in out life, remember that it is your test. God want you to make a better human being and through all your difficulties, he is always with you, taking you care. When he sees his image in you that is the time when you come up as a better human being.

उरलो बनून ज्वलंत प्रेरणा मना-मनात सर्वांच्या


15 ऑगस्ट च्या निमीत्ताने आतापर्यन्त देशासाठी प्राण त्यागणार् या सैनिकांसाठी माझी ही कविता


उरलो बनून ज्वलंत प्रेरणा मना-मनात सर्वांच्या
जरी जगी या उरलो नाही
लाख गोळ्या झेलूनही शत्रच्या या निढळया छाती वरती
किंचीतही मागे सरलो नाही

शत्रुचे इरादे पक्के होते
पण त्याहुनही आमचे ते तोडण्याचे
ते निघाले होते देश तोडाया आमचा
पण आमचा प्रयत्न तो जोडण्याचा

त्यांना वाटले सोपे सारे
कारण जाती-भेद इथे अनेक आहेत
कळे न् त्यांना प्रश्न देशाचा येता
सारे भारतीय एक आहेत

नाही दिसली पत्नी माझी
वाटेला डोळे लावून बसलेली
नाही ऐकली हाक मुलांची हवी हवीशी असलेली
हरलो असेन संसाराशी पण कर्तव्याशी हरलो नाही

उरलो बनून ज्वलंत प्रेरणा मना-मनात सर्वांच्या
जरी जगी या उरलो नाही
लाख गोळ्या झेलूनही शत्रच्या या निढळया छाती वरती
किंचीतही मागे सरलो नाही

जिंदगीसे ज्यादा चाहत है हमे

मित्रांनो,

पहिल्यांदाच हिंदी कविता लिहिलेय. आवडली तर like करा. प्रतिक्रिया कळवा...

जिंदगीसे ज्यादा चाहत है हमे
जिन्दगिया बनाने कि,
सच्चे दिलवाले हो जो लोग
उनके दिलों मे जगह पानेकी

वो ख्वाब ना देखें हम
जो ख्वाबो मे रह जाये,
हम जो दिल से सोचे, चाहे
हर हालत मे वो पाये

ना मिलेगा भगवान
अगर मंदिर, मस्जिद, गुरुद्वारोमे जाओगे
देने की चाह अगर हो दिल मे
तो हर इन्सान की मुस्कान मे उसे पाओगे

बस इतनीसी ख्वाहिश है दिलमे
के मरने से पहले चेहरेपे मुस्कान आये
मरते हुये भी अगर कोई सोचे हमारे बारेमे
तो उसमे भी फिरसे जान आये
तो उसमे भी फिरसे जान आये…

जय हिंद

- विनोद अनंत मेस्त्री

FIVE LOVE LANGUAGES

Hi Friends,

As we all know man is a social animal. He is not complete at his own. To succeed, he needs help of other people. But the issue is why other people should help me to make 'myself' successful. It happens only when we have a very good relationship with people.

So developing and maintaining good relation with people is very important.
To develop healthy relationship with people, we should learn and understand that every person has different love language. Understanding and acting on their love language is very important for any relationship. This will help in developing and maintaining healthy relationship with them.
These five love languages are:

1. Touch:
The person having 'Touch' as a love language are to be expressed love with use of Touch such as by holding hand, by hug.

2. Words:
The person having word as love language feel the love of other person only when he/ she express it by using words. They are happy when we express our feeling toward them by using words.

3. Receiving gift:
The person having 'Receiving gifts as a love language feel happy when they receive gift from other person, no matter it is small or big.

4. Quality time:
Few people feel the love of other person when he/ she spends quality time with them.

5. Act of Service:
The person having this particular love language feel being loved only when they other person help them in their work or do their work.

So friends, understand love language of your partner or any other relation and start acting on it now and you will see that in very short time your relationship will blossom.
All the best and as I always feel, you All are The Best.

आर्थिक बदलाचा सकारात्मक आनंद मिळवा.

नमस्कार मित्रांनो,
आज एका महत्वाच्या विषयावर आपल्याला सुसंवाद करायचा आहे. त्याआधी कालचा एक किस्सा सांगायला मला आवडेल. संध्याकाळी माझ्या लहान मुलीसाठी खाऊ घेण्यासाठी दुकानात एका शॉप मध्ये गेलो होतो. शॉप चांगल्या पद्धतीने सजविलेले होते. सर्व वस्तू नीट पाहून झाल्यावर मुलीला आवडणा-या तीन-चार लहान लहान खाऊच्या पुड्या घेतल्या, प्रत्येक पुडीवरची किंमत पाहून धसका बसत होता. त्या चार वस्तूंची किंमत २२५/- रुपये सांगण्यात आली. पैसे देवून शॉप मधून बाहेर आलो. डोक्यात विचार आला कि आमचे वडील आम्हा तीन भावांना खावू आणायचे, तेसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचा आणि स्वाभिमानाने सांगायचे. खावू पोटभर खा ! आजचा दिवस जेवला नाहीत तरीचालेल. संपूर्ण २०/- रुपये खर्च करून खावू आणला आहे. त्यावेळी मनात विचार आला कि २० वर्षापूर्वी पोटभर खावू तीन भावांना आणि तेही २०/- रुपयांमध्ये आणि आज एकटीसाठी हातातल्या लहानशा पिशवीत खावू घेतला तेही २२५/- रुपयाचा. 
मित्रांनो सांगायचे तात्पर्य एवढेच कि सतत वाढणा-या महागाईमुळे आपण आपल्या गरजा भागविण्यासाठी अपुरे पडत आहोत. मेहनत जास्त, मिळणारा मोबदलाही जास्त तरीही तडजोड करावी लागते. वर्तमानाची चिंता असताना भविष्यात काय होईल याचा विचार करून घाम सुटतो. 
ह्यावर एकच उपाय आणि तो म्हणजे योग्य प्रकारे भविष्यासाठी केलेली गुंतवणूक. 
मित्रांनो गुंतवणूक हा शब्द आपण निश्चितच ऐकला असेल. सेमिनार-लेख यातून ऐकला, वाचला असेल, तरीही फरक मात्र जसा व्हायला पाहिजे तसा होत नाही. ह्याला कारण स्वयं शिस्तीचा अभाव आणि आर्थिक शिक्षणाची पुरेपूर माहिती नसणे. म्हणूनच मित्रांनो गुंतवणूक विषय जितका जटील तितकाच महत्वाचा. 

१. पैशाची गुंतवणूक करणे महत्वाची आहे का ?
होय…
  • महागाईवर मात करण्यासाठी
  • भविष्यासाठी 
  • माझ्या आर्थिक स्वप्नांच्या पूर्ततेसाठी
२. गुंतवणूकेची नियोजन आवश्यक आहे का ?
होय… 
  • भविष्यातील येणा-या आर्थिक संकटांना सामोरे जाण्यासाठी, आणि त्या दिशेने योग्य वाटचालीसाठी
  • तुमच्या नंतर तुमचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या सुखी होण्यासाठी 
  • मुलांचे शिक्षण आणि Retirement Planning करण्यासाठी
  • Tax Out Flow कमी करण्यासाठी 
मित्रांनो, या सर्व गोष्टींची आपणास गरज आहे त्यासाठी "आय लीड माय लाइफ़" उपक्रमाअंतर्गत वरील सर्व गोष्टींचे ज्ञान तुमच्या पर्यंत पोहोचविणे, दोन महिन्यांच्या कालावधीत स्वत:मध्ये आर्थिकदृष्ट्या बदल घडविण्यासाठी, तुमची निर्णय क्षमता वाढविणे हेच आमचे उद्दिष्ट असणार आहे. 

मोठ्या संख्येने सामील व्हा ! आणि आर्थिक बदलाचा सकारात्मक आनंद मिळवा. 

धन्यवाद 
- सुनिल कानाळ  (आपला आर्थिक शुभचिंतक)

"आय लीड माय लाइफ़" - पर्व दुसरे


"जिंदगी हसने गाने  के लिये है पल दोपल" आपले शिक्षणाचे - कॉलेजचे दिवस असेच असतात. एक स्वप्नांची सुंदर दुनिया, कुठली प्रचंड मोठी जबाबदारी नाही. कुठलं मोठ टेन्शन नाहि. कॉलेज कट्टा, मित्र-मैत्रिणी, कॉलेजच्या कॅन्टीनमधला समोसा,  वडापाव, मिसळपाव, तासन तास गप्पा, सगळ काही स्वप्नवत. कधीही न संपावस वाटणारं स्वप्न. "बस ! सब ऐसाही चलता रहे." 
पण कधीतरी हे स्वप्न संपणार असत. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल कि आई-वडील आपल्याकडे अपेक्षेने पाहू लागतात. एक बैल थकला कि दुसरा बैल  घाण्याला जुंपावा तसं आपल्याला जबाबदारीच्या घाण्याला जुंपून घ्याव लागतं. मग समोर असत ते कठोर वास्तव.  
सकाळी ठरलेल्या वेळेवर बस किंवा ट्रेन पकडा. वेळेवर कामाला पोहचा. दिवसभर ठरलेल्या तारखेला मिळणा-या पगाराच्या अपेक्षेने प्रचंड मेहनत घ्या. संध्याकाळी बॉसने ठरवलेल्या वेळेनुसार ऑफिसमधून निघा. पुन्हा लोकल पकडा, घरी या,जेवून घ्या, टि.व्हि. बघा आणि झोपा. दुस-या दिवशी पुन्हा तशाच दिसणा-या दिवसाला सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हा.  
"जाने कहां गए ओ दिन" असं सातत्याने वाटयाला लागतं. हळूहळू समस्या अतिशय वेगाने वाढायला लागल्यात अस वाटू लागतं. दिवस भराच्या धावपळीत गडबडीत स्वप्न:कडे पाहन राहून जातं. अत्यंत भयंकर अशा चक्रात आपण अडकून जातो. जगण्याची गोडी हळूहळू कमी होवू लागते आणि जीवन जगणे हि फक्त आणि फक्त एक 'फॉंरमँलिटी' बनते. पण मित्रानो हे ते आयुष्य नाहीये ज्यासाठी आपण जन्म घेतलाय.  लागतं आयुष्य यापेक्षा वेगळ असायला हव. मी कसं जगावं हे परिस्थितीने, माझ्या कुटुंबाने, या दुनियेने ठरवू नये. माझ्या आयुष्याची स्टोरी इतरांनी का लिहावी ?  ती मी स्वत: लिहियला हवी . माझे जीवन, माझ्या भावना, माझी प्रगती, माझी स्वप्न, माझी नाती, माझा अर्थ (पैसा) या सर्वांवर माझं नियंत्रण असायला हवं. माझ आयुष्य माझ्या नियात्रणात असायला हवं
"आयुष्य जगण्याचे दोन मार्ग असतात, एकतर स्वत:च्या स्वप्नांसाठी जागा, नाहीतर दुस-यांची स्वप्नासाठी."
मला माझ्या स्वप्नांसाठी जगायचय, मला जे हवय ते मला चांगल्या मार्गाने मिलवायचय. माझ्या आयुष्याचा हेतू फक्त स्वत:पुरता मर्यादित आयुष्य जगण्याचा नाही तर मला या समाजाला आणि देशाला काही योगदान करायचय. मला एक प्रभावी व्यक्तिमत्व, एक उदाहरण बनायचय. पण हे सगळ कस शक्य होवू शकत ?
याचसाठी आम्ही "I Lead My Life" हा उपक्रम तयार केला आहे आणि याचा पहिला पर्व ७ जुलै, २०१३ तारखेला यशस्वीरित्या पूर्ण झाला. या उपक्रमात एकूण चार सत्रांचा समावेश आहे. 

सत्र क्र. १ : Self Mastery (स्वत:वर विजय) 

या सत्रात आपल्या समजुती, ज्या जीवनावर प्रचंड परिणाम करत असतात, त्या समजुतींवर काम केले जाते. स्वत:ला विकसित करण्यासाठी हि सर्वात पहिली आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि याची तुम्हा आम्हा सर्वांनाच गरज आहे. शिवाय या सत्रात आपल्या भावनांवर विजय कसा मिळवावा हे देखील शिकता येणार आहे. 

सत्र क्र. २ : Body Language & Communication Skill. (देहबोली आणि संभाषण कौशल्य)

उत्कृष्ट संभाषण हि काळाची गरज आहे. मी प्रचंड हुशार आहे, बुद्धिमान आहे. पण हि बुद्धिमत्ता आपल्या संभाषणातून दिसली नाहि, आपल्या देहबोलीतून दिसली नाही तर व्यर्थ आहे. 
मला Interview ला समोर जायला भीती वाटते 
मला चार चौघात बोलायला भीती वाटते 
मला नवीन व्यक्तींसोबत ओळख करायला, त्यांच्याशी बोलायला भीती वाटते 
आपल्यापेक्षा प्रभावी व्यक्तिमत्वाशी संभाषण कसं साधाव ते मला कळत नाही 
मला सभांमध्ये, स्टेजवर बोलण्याची भीती वाटते 
या जर आपल्या समस्या असतील तर त्यावर उपाय हे सत्र आहे. 

सत्र क्र. ३ : Finance Mastery (आर्थिक विजय)

महागाई प्रचंड वेगाने वाढत आहे. त्या वेगाने मिळकत वाढत नाहि. महागाई सोबत स्पर्धा करण माझ्या मिळकतीला कठीण जातंय. गुंतवणुकीचे योग्य मार्ग मला माहित नाहीत. सध्याच्या आर्थिक तडजोडीना मी कंटाळलो आहे. पैशाच्या अभावी मला हव तस आयुष्य जगता येत नहिये. मी पैशाच्या मागे धावून थकलो आहे. पैसा माझ्यासाठी काम कसा करू शकतो हे मला माहित नाहि. जर आपल्या या समस्या असतील तर त्याचं उत्तर हे सत्र आहे

सत्र क्र. ४ : Good To Great (चांगलेपनाकडुन महानातेकडे)

देवाने आपल्याला स्वार्थी किंवा स्वत:पुरते तडजोडीचे आयुष्य जगण्यासाठी पाठवलेले नाहि. त्याने आपल्याला एका खास हेतूने या पृथ्वीतलावर पाठवले आहे. या जगातील ९०% हून अधिक लोकांना हा हेतू कधी सापडत नाही किंबहुना ते शोधण्याच्या भानगडीत पडत नाहि आणि मरेपर्यंत एक सामान्य निरर्थक आयुष्य जगतात. हा सत्र आपल्याला जीवनाचा हेतू शोधण्यास मदत करेल. 
आपल्या आयुष्याचा नेमका हेतू काय ?
आपला जन्म नेमका कशासाठी ?  आणि तो कसा शोधावा ?  
हेतू प्राप्त करण्याचे मार्ग काय ?  
Strategic Planning म्हणजे काय ?
या स्पर्धात्मक युगात एक करिअर पुरेसा नाही मग एकाहून अधिक मिळकतीचे मार्ग कसे शोधावेत आणि राबवावेत ?
जगण्याचा मनमुराद आनंद कसा लुटावा ?
या जगाला योगदान कसे करावे ?
येणा-या पिढीसाठी उदाहरण कसे बनावे ? 
अपयशाला यशामध्ये रुपांतरीत कसे करावे ?
याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या सत्रात मिळतील. 
तुमच्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी "I Lead" ची संपूर्ण टीम सज्ज झाली आहे. गरज आहे ती तुमच्या निर्णयाची. एक निर्णय जो तुमच आयुष्य बदलेल. "I Lead My Life" च्या लीडर समूहात प्रवेश करण्यासाठी आजत संपर्क साधा…

आपला पर्व क्र. २ हा रविवार, दिनांक ४ ओगस्ट, २०१३ तारखेला सुरु होणार आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क साधा… 
022-65515004 / 8655850056 / 9819453533

I Lead My Life - पहिला पर्व पूर्ण झाल्या निमित्ताने

I Lead My Life - पहिला पर्वाचा पुरस्कार सोहळा गेल्या रविवारी (७ जुलै, २०१३) पार पडला. माझ्या आयुष्यातील अत्यंत अविस्मरणीय क्षणांपैकी हा एक होता.  
त्याची ३ कारणे आहेत. 
एक - या सोहळ्यात माझ एक स्वप्न सुरु झालं होत ते म्हणजे मध्यमवर्गीय विभागातील मुलांसाठी "व्यक्तिमत्व विकासाचे" धडे देणारा एखादा उपक्रम माफक दरामध्ये चालू करणे आणि हा उपक्रम चालू झाला होता… 
दोन - या उपक्रमा अंतर्गत पहिल्या पर्वामधून १७ जनांनी या उपक्रमाची ताकद अनुभवली आणि त्यांच्या नवीन जीवनाची वाटचाल सुरु सुरु झाली. 
तीन - या उपक्रमाच्या पूर्तता सोहळ्यात माझे तीन आदर्श एकत्र हजर होते. मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेतील सौ. पळशीकर बाई, राष्ट्रपती पदक विजेते पोलिस निरीक्षक श्री. संजय गोविलकर आणि सुप्रसिद्ध गुंवणूक तज्ञ श्री. अरुण सिंघ. 

या उपक्रमा अंतर्गत अत्यंत महत्वाच्या अशा चार गोष्टींवर आपण काम करतो. एक म्हणजे "आपल्या समजुती (Belief Syster – Self Mastery)", दुसरी "संभाषण कौशल्य आणि देह बोली (Communication Mastery)" तिसरी "आर्थिक नियोजन (Financial Mastery)" आणि चौथी म्हणजे "चांगलेपणाकडून महानातेकडे (Good To Great)”.

या संपूर्ण उपक्रमात ४२ दिवसांचा कालावधी प्रचंड अनुभव देऊन गेला. मुलांमध्ये होत असलेले बदल पाहून विश्वास प्रबळ होत गेला. समजुती ख-या किंवा खोट्या नसतात. त्या एकतर उपयुक्त असतात किंवा मर्यादा आणणा-या असतत. समजुतींवर काम करतानाचा एक अनुभव तुम्हाला सांगावासा वाततो. पहिला Session  - Self Mastery झाल्यानंतर माझा मुलांसोबत One To One Session होत असतात. त्यामध्ये मी मुलांची एखादी मर्यादा आणणारी समजूत बदलणार असतो.

प्रियांका नावाची माझी विद्यार्थिनी जी या उपक्रमच्या सुरुवाती आधी अत्यंत खचलेली होती आणि उपक्रम संपताना ती "Star Leader Award" जिंकून गेलि. या प्रियांका सोबत One To One Session चालू असताना तिने तिची मर्यादा आणणारी एक समजुत बदलण्यासाठी निवडली, ती म्हणजे "मला स्वत:च मत नाहि !'
मी तिला विचारले "अस तुला का वाटत ?"
"कारण मला काहीही करायचं असेल तर दुस-याला विचारव लागत, छोट्यात छोटी गोष्ट असली तरी सुद्धा ! मी कपडे जरी विकत घ्यायला गेले तरी सोबत कुणाला तरी न्याव लागत. मला काहीही करायच असेल तर मला माझ्या आईला, मोठ्या भावाला विचारल्या शिवाय ते करायला भीती वाटते, इत्यादी इत्यादी…. 

"या सर्व गोष्टींमुळे तुला वाटत कि तुला स्वत:च मत नाही"
"हो, अगदी !"
"अच्छा मला सांग, तुझी सर्वात जवळची मैत्रीण कोणती ?"
"of course प्रज्ञा"
"का ?"
"कारण, माझ्या प्रत्येक अडत्या वेळी तिने मला साथ दिलेय,  सावरलाय."
"म्हणजे या प्रज्ञा सोबत मैत्री करणं हा तुझ्या आयुष्यातला सर्वात Best Decision होता… Right ?"
"हो… शंकाच नाही"
मग हा Decision घेताना तू कोणाच मत घेतलं होतस ?"
"कोणाच नाही"
"मग, याचा अर्थ तुला तुझ मत आहे… Right  ?"
"हो"

या वेळी प्रियांकाचा चेहरा बघण्यासारखा होत. तिला तिच्या प्रश्नाचे उत्तर मिळालं होत. तिच्या नव्या रूपाशी तिची ओळख झाली होती. अशा प्रकारे प्रियांकाची समजूत "मला स्वत:च मत नाही" एका क्षणात बदलली. 

अशाच कित्येक मर्यादा आणणा-या समजुती आपण बाळगून आहोत. ज्या एका क्षणात बदलू शकतात आणि ते बदलण्यासाठी मदत करण्यास आम्ही सज्ज झालो आहोत. गरज आहे ती तुमच्या प्रोत्साहनाची आणि पाठबळाची. 

देश बदलण्याच प्रचंड सामर्थ्य या मध्यम वर्गीय पिढीमध्ये दडलेलं आहे. त्या सामर्थ्याची आम्ही या पिढीला ओळख पटवून देत आहोत. जग बदलायचं असेल तर प्रथम स्वत:ला बदलाव लागतं आणि हा बदल तुमच्यात घडवण्याच काम I Lead My Life करत आहे. 

असेच I Lead चे किस्से घेवून भेटत राहू… धन्यवाद !!!

- विनोद अनंत मेस्त्री 





उद्योजकाची पहिली भेट - नवी ओळख नवी नाती

४ जुलै २०१२ , मराठी बिझनेस क्लब मध्ये वी आय पी गेस्ट म्हणून बोलण्यात आले होत . mbc सदस्यांचा उत्साह , मिटिंग राबवण्याची पद्धत आणि एकमेकांबद्दल सहकार्याची भावना पाहून थक्क झालो .मराठी उद्योजकांसाठी व्यवसाय बुद्धीची अत्यंत उत्तम योजना म्हणजे MBC मिटिंग. नेट्वर्किंग च्या संकल्पनेवर आधारलेल्या मराठी बिझनेस क्लब म्हणजे उद्योजकांसाठी सुवर्ण संधी म्हणता येईल . नेट्वर्किंग म्हटलं तर नवनवीन लोकांना भेटणं आलं, ओळख करणं, ओळख वाढवणं आणि टिकवणं आलं. परंतु प्रथमच एखाद्या व्यक्तीला भेटल्यावर तिच्याशी ओळक कशी करावी ? बोलण्याची सुरवात कशी करावी ? संभाषण कसं वाढवावं ? आणि त्या एकाच भेटीत त्या व्यक्तीला आपलसं कसं करावं हे प्रश्न कित्येकांना पडत असतात. या सर्व प्रश्नांची उत्तर म्हणून मी हि पोस्ट लिहित आहे. याचा आपणाला निश्चितच फायदा होईल याची मला खात्री आहे.

त्यासाठी काही टिप्स खालील प्रमाणे :-

समोरच्या आवडीच्या विषयाने सुरवात :- मानवाबद्दल एक नैसर्गिक गोष्ट आपण सर्वांनी लक्ष्यात घ्यायला हवी, ती म्हणजे, आपल्यातील प्रत्येकाला एका गोष्टीत प्रचंड रस असतो आणि ती गोष्ट म्हणजे आपण स्वतः. "प्रत्येक व्यक्तीचा प्रचंड आवडीचा विषय म्हणजे, ती स्वतः" असते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला भेटल्यावर तिच्या विषयी प्रश्न विचारा.
उदारण :- "आपण काय करता ?" किवा "आपण कोणत्या क्षेत्रात आहात ?" "आपला गावं ?" "तसे आपण राहायला कुठे आहात ?" किवा त्या व्यक्तीकडे असलेल्या एखाद्या वस्तूचा आधार घेऊन आपण सुरवात करू शकता "nice watch, how is it.. नाही म्हणजे मलासुद्धा असेच घड्याळ घ्यायचय परंतु गोंधळात आहे कोणत्या कंपनीचं घ्यायचं. तुम्हाला या कंपनीचा अनुभव कसा आहे ?" एखाद्या व्यक्तीला तिच्या स्वतःबद्दल विचारणे हा सर्वात उत्तम communication starter मानला जातो.


OPEN ENDED प्रश्न विचारा :- संवाद वाढवण्यासाठी नेमही OPEN ENDED प्रश्नांचा वापर करावा. म्हणजे असे प्रश्न ज्याचे उत्तर विस्तृत मिळेल.
उदारण :- "मला या गोष्टी बदल तुमच्या कडून काही माहिती मिळेल?" "तुम्ही हेच क्षेत्र का निवडले ?" शक्यतो ' yes /no '  प्रकारचे प्रश्न टाळावेत म्हणजे असे  प्रश्न ज्याचे  उत्तर फक्त 'हो' किंवा 'नाही' मध्ये येईल अशा प्रश्नांचा वापर करू नये. ' yes /no'  प्रकारची प्रश्नांची संभाषणे तिथेच थांबवा.  OPEN ENDED  प्रश्नामुळे संभाषण बहरत जात.


मत विचारा :-" या अमुक गोष्टीबद्दल आपलं काय मत आहे ?" हा संभाषण उत्तेजित करणारा उत्तम प्रश्न आहे. कारण प्रत्येकाला आपला मत मांडायला आवडत. परंतु हा प्रश्न विचारताना एक गोष्ट लक्ष्यात घ्यावी ती म्हणजे आपण त्यांना ज्या गोष्टी बद्दल मत विचारतोय, तो त्या व्यक्तीचा आवडीचा माहितीचा विषय असायला हवा !  


परिणामकारक ऐकण:-प्रत्येकाला ऐकणारा हवा असतो हा नियम लक्ष्यात घेऊन, जेव्हा समोरची व्यक्ती बोलत असेल तेव्हा त्याच बोलण काळजीपूर्वक ऐका, समजून घेण्यासाठी ऐका. ऐकून घेतल्याने आपण समोरच्या व्यक्तीला आपलेसे वाटायला लागतो. त्यामुळे आपला संपूर्ण लक्ष त्याचं/तिचं बोलण ऐकण्याकडे केंद्रित करा. ( परिणाम कारक ऐकण, याबद्दल विस्तृत लिहून माझा ब्लोग vinodmestry.blogspot.com वर लवकरच पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन.)


संभाषणाचा शेवट, नात्याची सुरवात :-संभाषणाचा शेवट देखील योग्य रितेने करता यायला हवा. संभाषणाचा शेवट हि नात्याची सुरवात ठरायला हवी.
उदारण :-"sir / madam, धन्यवाद आपल्याकडून ब-याच नव्या गोष्टी समजल्या. तुमच्यासोबत बोलून आनंद वाटला. I hope पुढेही असेच सहकार्य कराल."एक गोष्ट ध्यानात असू द्या, वरील सर्व गोष्टी नैसर्गिकरित्या व्हायला हव्यात, त्यात नाटकीपणा नसावा.



पुढे आपल्याशी संवाद माझ्या ब्लोग मधून साधणार आहेच. तो पर्येंत all the best and as i always believe, you all are the best 

धन्यवाद
Reff. Book : रिचार्ज - आयुष्याची पुनर्बांधणी (लेखक : संजय गोविलकर)

- विनोद अनंत मेस्त्री (9819453533)

असामान्य यशप्राप्तीच्या आठ समजुती...

नमस्कार मित्रांनो,
आपण आपलं आयुष्य समजुतींवर जगत असतो. माणूस हा समजुतींचाच बनलेला असतो (Man is what he believes). आपल्या समजुती अप्रत्यक्ष पणे आपल्या विचारांवर, कृतींवर तसेच शरीरावर परिणाम करत असतात. माझा प्रबळ विश्वास आहे कि आपण जे मानतो ते आज न उद्या घडणारच आहे आणि ते घडते. अनेक वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार हे सिद्ध झालेले आहे कि समजुती आपल्या जीवनावर प्रचंड परिणाम करतात. 
आता पुढील घटना वाचा आणि विचार करा...
एका Freezer मालवाहू ट्रेन मध्ये काम करणारा एक कर्मचारी ट्रेन सुटायला २ तास आहेत हे लक्षात घेऊन फ्रीझर डब्यात झोपला. एका तासाभरात जाग येईल असा त्याचा अंदाज होता. परंतु त्याला जेव्हा जाग आली तेव्हा ट्रेन चालू झाली होती. अशा ट्रेन मध्ये फक्त पहिल्या आणि शेवटच्या डब्यात कर्मचारी आणि मध्ये सगळे फ्रीजरचे डबे असतात. पुढील स्टेशन २ तासावर. फ्रीझर चालू रहाणार आणि तापमान गोठण बिंदूच्या खाली जाणार आणि आपण गोठून मारणार या भीतीने त्याचा थरकाप उडाला. दोन तासानंतर ट्रेन पुढील स्टेशनवर पोहचली आणि हा कर्मचारी मृत अवस्थेत सापडला. post mortem report नुसार त्याचा मृत्यू गोठून झाला होता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या डब्यातला फ्रीजर बंध होता. 
हे सगळ्यात उत्तम उदाहरण आहे कि नुसतं गोठून मारणार या मानण्याने त्या कर्मचाऱ्याचा गोठून मृत्यू झाला. 
समजुती खऱ्या किंवा खोट्या नसतात. त्या एकतर तुम्हाला पुढे घेऊन जाणाऱ्या (useful Beliefs) असतात किंवा तुमच्यावर मर्यादा आणणाऱ्या (Limiting Beliefs) असतात. यशस्वी व्हायचं असेल तर मर्यादा आणणाऱ्या समजुती बदलणं आणि पुढे नेणाऱ्या समजुती स्वीकारणं गरजेचं असतं. 
या जगातील कित्येक यशस्वी लोकांचा अभ्यास केल्यास त्यांच्या अनेक प्रभावी समजुती हाती लागतात. त्यातील अत्यंत महत्वाच्या अशा  आठ समजुती तुमच्यासमोर या सेमिनार मार्फत सादर केल्या जाणार आहेत. ज्या आपण समजून घेतल्या आणि मानल्या तर यश निश्चितच ! 

या सेमिनार मधून आपण काय शिकाल?
१. समजुती आणि Positive Thinking या मधील फरक. 
२. समजुतींचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम.  
३. आपण जे जीवन जगतोय ते केवळ आपल्या समजुतींमुळे. 
४. समजुती बदलून आपलं जग कसं बदलू शकतं. 
५. यशस्वी होण्यासाठी कोणत्या आठ समजुती आपण बाळगायला हव्यात? 

हा सेमिनार कोणासाठी?
जीवनात यशस्वी होण्याची आणि आहे ती परिस्थिती बदलण्याची इच्छा असलेल्या त्या प्रत्येकासाठी.

चला तर मग तयार होवुया आपलं जग बदलायला…  



वक्ते : विनोद अनंत मेस्त्री 
M.Com, C.S. Inter, NLP Practitioner,


रविवार, दिनांक 7 जुलै 2013,
वेळ : सकाळी 10.30 वाजता 
पत्ता : गोवंडी गावदेवी ट्रस्ट हॉल, कुर्ला नागरिक बँक समोर, गोवंडी, मुंबई - 400 088
प्रवेश शुल्क : विनामुल्य          

अधिक माहितीसाठी संपर्क साधा : 
022-65515004 / 8655850056 / 9819453533

प्रवेश पत्रिका आवश्यक



The Responsibility Pledge

I love the saying "Where there is a will, there is a way."
My experience tells me that when we are in tough times, we learn a lot. tough time make us think differently and innovate. success is the result of many failures. 
Just take responsibility. 

The Responsibility Pledge

I accept complete responsibility for myself, my life, my family, my financial situation and everything that happens to me.
I am a completely free, proud, self-reliant individual. I look to myself for the answers to my questions and the solutions to my problems.
I am a complete optimist. I look for the good in every situation. I seek the valuable lesion in every setback or obstacle. I think about my goals and how I can achieve them most of the time. I focus on the solution rather than the problem.
I am not a victim. I refuse to complain, condemn or criticize. If I am not happy with situation, I take action to change it. I blame no one for any aspect of my life.
I recognize that there is a fair and full price that must be paid for anything worthwhile. I do not try to get something for nothing. I refuse to accept something for nothing and I do not support any person, process or policy that attempts to give me or anyone else anything to which I or they are not justly entitle to as the result of personal hard work and sacrifice.
I am a successful, happy person. I am grateful for my life and my opportunities. I believe that everything in the universe is conspiring to make me happier, healthier and more prosperous.
I have an attitude of gratitude toward everyone and everything.


पोलिसांचा ‘जीवनरंग’ बदलतोय!


मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पोलिसांच्या समस्या आणि त्यांचे आयुष्य सर्वासमोर आले आणि अनेक संस्थां त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सरसावल्या. आजघडीला अनेक जण आपापल्या परीने त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र ‘जीवनरंग’ ही स्वयंसेवी संस्था त्यात उजवी ठरली आहे. दक्षिण विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशन यांच्या नेतृत्त्वाखाली सध्या या संस्थेतर्फे १० दिवसांची कार्यशाळा घेण्यात येत असून त्यात पोलिसांना त्यांची जीवनशैली बदलण्याबरोबरच कुटुंब, नातेवाईक आणि इतर समाजाशी कसे ऋणानुबंध जुळवावेत, आरोग्याची काळजी कशी घ्यावी, सकारात्मक दृष्टीकोनासाठी काय करावे आणि विशेष म्हणजे तुटपुंज्या पगारातूनही विविध प्रकारे गुंतवणूक करून भविष्य सुरक्षित कसे करता येईल, याविषयीचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. याद्वारे पोलिसांच्या आयुष्याची पुनर्बाधणी करण्यात येत आहे. पोलिसांकडूनही त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे.
नागपाडा येथील कार्यालयात सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ या वेळेत पोलिसांच्या आयुष्याच्या आणि जीवनमानाच्या पुनर्बाधणीची कार्यशाळा घेण्यात येते. दक्षिण विभागात एकूण १७ पोलीस ठाण्यांचा समावेश असून प्रत्येक पोलीस ठाण्यातील एक अधिकारी आणि दोन हवालदार दररोज या कार्यशाळेत सहभागी होतात. डॉ. व्यंकटेशन यांनी तसा आदेशच प्रत्येक पोलीस ठाण्याला दिला आहे.

२६/११ नंतर पोलिसांच्या समस्या प्रकर्षांने समाजापुढे पुढे आल्या. त्यानंतर त्यांना शस्त्रास्त्र प्रशिक्षणासोबतच आरोग्य, मानिसक, स्नेहसंबंध आणि गुंतवणुकविषयीही मार्गदर्शन देण्याची गरज असल्याचे हेरून संजय गोविलकर, स्नेहल गोविलकर, अरूण सिंग, अतुल राजोळी, मिलिंद बने आणि विनोद मेस्त्री या ‘जीवनरंग’च्या चमुने डॉ. व्यंकटेशन यांच्याकडे ‘पोलिसांच्या आयुष्याच्या पुनर्बाधणी’चा प्रस्ताव सादर केला. डॉ. व्यंकटेशन यांनीही वेळ न दवडता त्याला हिरवा कंदील दाखवून कार्यशाळा घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर ही १० दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत  संजय गोविलकर, स्नेहल गोविलकर, अरूण सिंग, अतुल राजोळी, मिलिंद बने आणि विनोद मेस्त्री यांची पाच सत्रे होतात. ‘जीवनरंग’चा प्रत्येक सदस्य हा त्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञ असून केवळ सामाजिक बांधिलकीतून ते ही कार्यशाळा घेत आहेत व त्यासाठी एकही पैसा ते त्यांच्याकडून घेत नाहीत.

कार्यशाळेतील पहिले सत्र हे  अतुल राजोळी यांचे असते. ‘माईंड ट्रेनर’ असलेले राजोळी या सत्रात जीवनाशी संबंधित छोटय़ा आणि रोचक कथा सांगून ‘प्रो-अ‍ॅक्टिव्हीट’बद्दल म्हणजेच स्वत:च्या आयुष्याची, वागणुकीची आणि भावनांची जबाबदारी ही त्यांची स्वत:ची जबाबदारी असल्याबद्दल मार्गदर्शन करतात. तसेच त्यांच्या आवाक्यात असलेल्या गोष्टींना प्राधान्य देऊन स्वत:चे आयुष्य सुखी करण्याचा मंत्रही देतात. आहारतज्ज्ञ असलेल्या स्नेहल गोविलकर या कार्यशाळेत सहभागी झालेल्या पोलिसांना आहाराचे आणि त्यांच्या शरीराचे महत्त्व समजावून सांगतात. याशिवाय आहाराचे व्यवस्थापन कसे करावे याचे मार्गदर्गनही करतात. स्वत: पोलीस सेवेत असलेले संजय गोविलकर पोलिसांना शरीराच्या ‘बायोलॉजिक वॉच’ची माहिती देऊन अनियमित डय़ुटी करतानाही निसर्गाने बनविलेले हे ‘बायोलॉजिकल वॉच’ कसे सुरू ठेवावे याबद्दल मार्गदर्शन करतात. पोलीस म्हणजे उद्धट, बोलण्याची शिस्त नाही असे सर्वसामान्यांचे मत असते. नेमका हाच धागा पकडून विनोद मेस्त्री या कार्यशाळेत पोलिसांना त्यांच्याबद्दल समाजमनात-कुटुंबात असलेली त्यांची प्रतिमा ‘मानवी स्नेहसंबंधा’च्या माध्यमातून बदलण्याचा गुरुमंत्र देत आहेत. या कार्यशाळेतील सगळ्यात आवडते आणि महत्त्वाचे सत्र असते ते अरुण सिंह यांचे. अरुण सिंह हे पोलिसांना सुरक्षित, मध्यम सुरक्षित ते असुरिक्षत गुंतवणुकीबाबतचे धडे देत आहेत. तुटपुंज्या वेतनातून भविष्य कसे सुरक्षित करावे याबाबतचा सल्ला आजपर्यंत पोलिसांना कुणीच दिलेला नाही. त्यामुळेच अरुण सिंह यांच्या या सत्राला पोलिसांकडून अधिक पसंती मिळत आहे.

पोलिसांसाठीचे हे मार्गदर्शन केवळ एका दिवसाच्या कार्यशाळेपुरते मर्यादित राहू नये यासाठी ‘जीवनरंग’तर्फे विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळेच दिवसभर कार्यशाळेत सहभागी होणा-या पोलिसांच्या चेह-यावर काही तरी नवे गवसल्याचा आनंद दिसू लागला आहे.


"I LEAD MY LIFE" My Life My Control...



Learn how to live life in their own way!

This is leadership development program for graduate working students who want to achieve the best out of their lives which includes powerful skills required to live life we want and excel in competitive world.


SELF MASTERY
We are what we believe. Our beliefs make our world. If we are failing to get success, it can be because of the set of beliefs we have. Changing limiting beliefs to the useful beliefs will help you get all that what you want out of life.
  • Finding out limiting beliefs.
  • Changing limiting beliefs to the most useful one.
  • Learning how to identify our emotions.
  • Positive emotions and their effective use.
  • Negative emotions and their positive use.
  • How to maintain positive state always.
  • Relaxation techniques.

COMMUNICATION MASTERY
One who can win his tongue can definitely win the world. Effective communication is a way to enter people's heart. Learning and understanding communication styles of people and communicating accordingly helps us connecting with people. In this session we learn 10 fundas of effective communication.
  • Understanding Communication model.
  • Understanding Communication Styles of people and communicating accordingly.
  • How to communicate effectively in first meeting.
  • Rapport Building.
  • Body language and it’s effective use.
  • Tips on Public speaking – meetings, social events, on stage etc.
  • Effective Listening.

FINANCIAL MASTERY
Inflation is reaching a terrible height every
year. Unfortunately, our income doesn't raise at same speed which causes short of finance
which in turn result in frustration.
In this session, we learn how to plan our money from present income and can create a wealth. No inflation can dare to beat us.
  • Difference between saving and investment
  • Introduction to Share Market, Mutual Funds, Commodity Market etc.
  • How to create wealth.
  • Managing risk in investment.
  • Preparing own portfolio.
  • How to get financially retire at the age of 35-40.

GOOD TO GREAT
We are basically ‘Good’ people. We are born as a normal human being. But we must die contributing something great to the world. That would be real success. In this session  we will learn how to reach category of ‘Great’ People by finding ultimate purpose of your life and working on it.
  • Finding Purpose
  • Deciding Midway Stops
  • Building Capabilities
  • Strategic Planning and Execution
  • Success-failure equation
  • Enjoying the Process
  • Being an Example
Workshop will start from 9th June to 30th June 2013. Morning 8am to 12pm. 
Venue : PN 391, Navin Nagar, Ground Floor, N. G. Acharya Marg, Borla-Govandi, Mumbai - 400 088.
Contact : 022-6551 5004 / 8655850056 / 9819453533

शोध स्वतःचा...


दगदगीच जीवन, सातत्याने वाढणारी जीवघेणी स्पर्धा, सुरळीत आयुष्य जगण्याच्या प्रयत्नात तितकाच वाढत जाणारा गुंता, दिवस-रात्र विविध चिंतांनी ग्रासलेला मन. या सगळ्यातून एखाद्या दिवसाखेर  कुठेतरी वाटत बस!  थोडं थांबायला हवं. 

परंतु पुन्हा दुसऱ्या दिवशी सर्व ताकद एकवटून आणखी एका 'रोजसारख्या' दिवसाला सामोरे जायला आपण सज्ज होतो. आणि एक मोठा कालावधी लोटल्यावर आपल्याला या आव्हानात्मक आयुष्याचा कंटाळा यायला लगतो. आरश्यात पाहिल्यावर आपलीच प्रतिमा आपल्याकडे अनोळखी नजरेने पाहायला लगते. 
 बरच काही कमवल्यानंतरही जिंकल्याचा आनंद होत नाही कारण एक महत्वाची गोष्ट आपण हरवून बसलेलो असतो. ती गोष्ट म्हणजे ' माझ्यातला मी'. 

हि अनुभूती आज न उद्या बहुतेकांच्या वाट्याला येणारच असते. याचं कारण म्हणजे सतत संसाराच्या, कामाच्या, भविष्यातील चिंतांच्या मागे धावताना आपण स्वतःकडे पहायचं विसरून जातो. 
अश्या भांबावलेल्या अवस्थेत आपण असाल तर तो एकाच गोष्टीच संकेत आहे तो म्हणजे स्वतःचा शोध  घ्या. 
त्यासाठी एखाद दिवस काढा स्वतःसाठी. हो एक दिवस फक्त स्वतःसाठी. जागा ठरवा. एखाद निसर्गरम्य ठिकाण, एखादा समुद्र किनारा, असे कोणतेही ठिकाण जिथे तुमच्या सोबत असेल मन प्रसन्न करणारे वातावरण आणि एकांत. अश्यावेळी सोबत घड्याळ नको, मोबाईल नको. थोडक्यात तुम्हाला स्वतःपासून दूर नेईल अशी एखादीही गोष्ट नको. डोकावून पहा स्वतःमध्ये. स्वतःला विचार -
"मी जे करतोय त्या मध्ये खरोखरच खुश आहे?"
"हेच ते आयुष्य आहे जे मला जगायचय?"

जर नाही तर "अश्या कोणत्या गोष्टीना मी वेळ द्यायला हवा ज्याने माझ्या आयुष्याला अर्थ प्राप्त होईल ?"
किंवा 
"आज जर मला अपयशी व्हयाची भीती नसेल तर मी कोणतं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असता?" 
किंवा 
"आज मी जे करतोय त्यात माझी बुद्धिमत्ता पणाला लागत आहे का? 
-मी दिवस रात्र एक करून हि गोष्ट करायला तर असतो का? 
-मी जे करतोय ते इतर कित्येक लोकांची गरज आहे का? 
-आणि हे काम करताना माझी सद्सदविवेकबुद्धी मला साथ देतेय का?" या अगदी शेवटच्या प्रश्नात उद्भवलेल्या प्रश्नांपैकी एकच जरी उत्तर 'नाही'  असेल तर विचार करायला हवा. 

अश्या कामाचा शोध घ्या ज्यामध्ये तुमची बुद्धिमत्ता पणाला लागेल. ज्या गोष्टीचं तुम्हाला वेड असेल . जे काम कित्येकांची गरज असेल आणि ज्यात तुमची सद्सदविवेकबुद्धी तुम्हाला साथ देईल.
एक अखंड दिवस असा घालवा ज्यात या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. आणि जिथे तुम्हाला याची अनुबुती आली, अर्थपूर्ण आयुष्याची सुरुवात झालीच समजा. 

मग वाट कसली बघताय? टाका एक सुट्टी स्वतःच्या नावावर आणि लागा कामाला! देव तुम्हाला स्वतःची गाठ घडवून देण्यास मदत करो हीच शुभेच्छ्या! 

प्रतिक्रिया कळवा. 

-  विनोद अनंत मेस्त्री 
Related Posts Plugin for WordPress, Blogger...